Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण

Webdunia
बुधवार, 22 मे 2019 (17:36 IST)
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आता उद्या दुपारी राज्यातील कल येण्यास सुरुवात होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
राज्यात चार टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण ९८,४३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करण्यात आला.  राज्यातील ३८ ठिकाणी ४८ केंद्रावर मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत राज्यातील कल हाती येण्यास सुरुवात होतील आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. राज्यातील एवढ्या जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल असे चार टप्प्यांत मतदान झाले. राज्यांत ८६७ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात गेल्या २०१४ मधील निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी किचिंत अधिक म्हणजे ६०.८० टक्के मतदानाची नोंद झाली.
 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर आणि भिंवडीत मतमोजणीच्या सर्वाधिक प्रत्येकी ३५ फेऱ्या होतील. त्यानंतर भंडारा- गोंदियात ३३ आणि बीड, शिरुरमध्ये ३२ फेऱ्यांत मतमोजणी होईल. हातकणंगलेत सर्वात कमी १७ फेऱ्या होतील. अमरावती आणि सांगलीत प्रत्येकी १८ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments