Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च

sujay vikhe patil
Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (09:18 IST)
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारासाठी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यांनी आतापर्यंत 45 लाख 34 हजार 515 रुपये खर्च केले असल्याचे निवडणूक आयोगाच्या लेखा टीमने म्हटले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी 30 लाख 46 हजार 176 रुपये खर्च केले असल्याचे टीमने नमूद केले.नगर लोकसभा मतदारासंघासाठी मंगळवारी (दि.23) निवडणूक होत आहे.
 
मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्‍लक असल्याने, प्रचारासाठी सर्वच उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे.या धावपळीत निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे  खर्चाच्या हिशेबाचा मेळ घालता घालता उमेदवारांची दमछाक होत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवाराला 70 लाख रुपयांचा निवडणूक खर्च करण्याची मुभा भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.सभांसाठी आवश्यक साहित्य, खुर्च्या, टेबल तसेच जेवणावळी, चहा, नाश्ता आदींसाठी विविध खाद्यपदार्थांचे दर आयोगाने ठरवून दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तात्काळ निवडणूक खर्चाचे मीटर सुरु होते. उमेदवार वा राजकीय पक्षांच्या सभेत वा रॅलीत कोणकोणत्या वस्तू वा गाड्या वापरल्या जातात,याची पाहणी करण्यासाठी निवडणूक विभागाने विविध पथके तयार केली आहेत. उमेदवारांच्या खर्चावर या पथकांची बारीक नजर आहे. 
 
उमेदवारांचा झालेला खर्च 
 
नामदेव वाकळे 50998, डॉ. सुजय विखे 4534515, आ. संग्राम जगताप 3046176, कलीराम पोपळघट 25800, धीरज बताडे 14630, फारुख शेख 28300, सुधाकर आव्हाड 34993, संजय सावंत 30700, आप्पाासाहेब पालवे 25800, कमल सावंत 102838, दत्तात्रय वाघमोडे 26200, भास्कर पाटोळे 27257, शेख आबीद हनीफ 55480, साईनाथ घोरपडे 34249, ज्ञानदेव सुपेकर 57444,  संजीव भोर  63650, संदीप सकट 19390, श्रीधर दरेकर 33145 रुपये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments