Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडकरी यांच्याविरोधात सर्वाधिक 29 उमेदवार

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:59 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यात सात जागांसाठी एकूण 116 उमेदवार मैदानात आहेत. नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. नागपुरातून विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरोधात सर्वाधिक 29 उमेदवार मैदानात असतील. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचाही समावेश आहे.
 
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments