Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:10 IST)
सांगली- आयुष्याभर संसार करण्यात वेळ आणि वय निघून जातं आणि खरी साथाची गरज भासते ती म्हणजे जीवनाच्या शेवटल्या टप्प्यावर. पण कित्येकदा या सुखाच्या क्षणांमध्ये दोघांमधील एक साथ सोडून जगाला निरोप देतं आणि मागे राहिलेल्या साथीदाराला एकाकी जगणं ओझं वाटू लागतं. अशात नवा साथीदार मिळाला तर उरलेलं आयुष्य कसं सुखाचं आणि आनंदचं होऊ शकत याच विचाराने एक आगळावेगळा विवाह संपन्न झाला. ज्यात नवरदेवाचं वय ७९ वर्षे तर वधूचं वय ६५ वर्षे आहे.
 
मिरजेतील आस्था बेघर महिला केंद्रात हा विवाह सोहळा संपन्न झाला. मिरजेतील आस्था बेघर केंद्रात मुलींसह काही वृद्ध आश्रय घेतात. येथे यापूर्वी अनेक मुलींचे विवाह झाले परंतु मंगळवारी झालेला विवाह सोहळा मात्र काही वेगळाच रंग घेतलेला होता. 
 
बेघर केंद्रात आश्रयाला असलेल्या पुण्याच्या शालन पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यामुळे संघर्ष करत होत्या. कुणावर भार नको म्हणून त्यांनी मिरजेतील आस्था बेघर केंद्राचा आधार घेतला. कवठे एकंद येथील ७९ वर्षीय निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे यांची मुलं बाहेरगावी असून पत्नीच्या निधनानंतर एकाकी जगण्याचा त्यांना कंटाळा आला. भावनिक आधाराची गरज असल्याने त्यांनी मुलांच्या सहमतीने पुन्हा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा वधूशोध आस्था बेघर केंद्रातील शालन यांच्याजवळ येऊन थांबला.
 
आस्था बेघर केंद्राने शालन आणि दादासाहेब या दोघांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आणि लग्नाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. वयाचे बंधन झुगारून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
या सोहळ्यासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी शुभ संदेश पाठवून आशीर्वाद दिला. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे, केंद्र संचालिका सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, अश्विनी नागरगोजे, रूपाली काळे, आदी उपस्थित होते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments