Marathi Biodata Maker

आता ‘Delhi to London’ बस, जाणून घ्या तिकिटाचे पैसे आणि वेळ

Webdunia
सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (13:25 IST)
रस्त्यावरुन जग फिरण्याची हौस असणार्‍यांसाठी कामाची बातमी म्हणजे आता विमान प्रवास व्यतिरिक्त लंडन पोचहण्यासाठी एक आणखी पर्याय समोर आला आहे. गुरुग्राममधील एका ट्रॅव्हल एजन्सीने दिल्ली ते लंडन बससेवेची घोषणा केली आहे. ही ट्रिप 70 दिवसांची असेल. खासगी प्रवास कंपनीने 15 ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे. 'बस टू लंडन' असं या सेवेचं नाव आहे. 
 
70 दिवसांमध्ये 18 देशांमधून प्रवास करत ही बस लंडनमध्ये पोहोचेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 18 देशांमार्गे हा प्रवास असेल.
 
20,000 किलोमीटरच्या या बस प्रवासासाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे. केवळ 20 प्रवासीच या बसमधून प्रवास करु शकणार आहेत. सगळ्या सीट बिजनेस क्लासच्या असतील. या व्यतिरिक्त प्रवासामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. बसमध्ये 20 प्रवाशांशिवाय एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, ट्रिप आयोजित करणाऱ्या कंपनीचा एक केअरटेकर आणि एक गाईड असतील. 
 
यात प्रवसासाठी एका व्यक्तीला 10 देशांचा व्हिसा लागणार आहे. कंपनीच व्हिसाची संपूर्ण सोय करणार असून प्रवास 4 भागांमध्ये विभागण्यात आला आहे. लंडनपर्यंत प्रवास करता येत नसणारे ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतील. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments