suvichar

कोरोनाव्हायरस शरीरातून कायमचा जाण्यासाठी लागतो इतका कालावधी

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (11:58 IST)
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची लागण झालेले रुग्ण बरे होण्याची दर वाढत असली तरी काही देशांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग होत असल्याचे धक्कादायक प्रकरणं देखील समोर येत आहे. अशात प्रश्न पडतो की कोरोना व्हायरस शरीरातून कायम जाण्यासाठी किती कालावधी लागतो?
 
यातच आता इटलीमधील शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती देत सांगितले की कोरोना संक्रमित रुग्णाच्या शरीरातून व्हायरस जाण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो. अशात रुग्णांनी रिर्पोट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी त्यांची दुसरी चाचणी केली पाहिजे.
 
सध्या जगात एकूण 2 कोटी 58 लाख 89 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 कोटी 81 लाख 72 हजार 671 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 8 लाख 60 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात तब्बल 68 लाख 56 हजार 883 अॅक्टिव्ह रुगण आहेत. 
 
एवढेच नाही तर पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
 
Modena and Reggio Emilia युनिव्हर्सिटीचे डॉ. फ्रान्सिस्को व्हेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1162 रुग्णांचा अभ्यास केला. यात कोरोना रूग्णांची दुसरी चाचणी 15 दिवसांनी, तिसरी 14 दिवसांनी आणि चौथ्यांदा 9 दिवसांनी करण्यात आली. यात आढळून आले की पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असतो. या ‍रिर्पोटप्रमाणे 50 वर्षापर्यंतच्या वयोगटातील लोकांना 35 दिवस आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या रुग्णांना पूर्ण पणे बरे होण्यासाठी 38 दिवस लागतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने महागाई भत्ता वाढवला

Ashok Kharat case अशोक खरात ३० एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहणार; पोलीस पाचव्या प्रकरणात रिमांडची मागणी करणार

महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले-विरोधकांनी महिला शक्तीच्या वाढीला खीळ घातली, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील धर्मांतर आणि अमली पदार्थांच्या प्रकरणांवर उच्चस्तरीय बैठक बोलावली

LIVE: २० ते २२ एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

पुढील लेख