Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ग्लोबल र्वॉंर्मिग'मुळे भारत गमावतोय थंड वातावरण

Webdunia
शनिवार, 28 जुलै 2018 (00:15 IST)
ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी कमी होत असलेल्या नऊ सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अध्ययनातून समोर आले आहे. यामुळे आरोग्य तसेच जलवायूचा धोका वाढू शकतो. धोरणकर्त्यांनी ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या देशांना तत्काळ थंड ठेवण्यासाठी योग्य पावले उचलायला हवीत, असा सल्ला या अध्ययनातून देण्यात आला आहे. सरकार व गुंतवणूकदारांना सगळ्यांसाठी टिकाऊ शीतलता, साधान उपलब्ध करण्यातून मिळणारी उत्पादकता, रोजगार व वृद्धी लाभांसह विशाल वाणिज्य तसेच आर्थिक संधींचे आकलन करणे व त्यावर काम करण्यास सहकार्य करायला हवे. प्रोवाइडिंग सस्टेनेबल कुलिंग फॉर ऑल नावाचे हे पहिलेच अध्ययन असून त्यात जागतिक शीतलतेसमोरील वाढती आव्हाने व संधींचे आकलन करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जागतिक पातळीवर सुारे 1.1 अब्ज लोक शीतलतेच्या कमतरतेच्या जोखमीची जोखीम उचलत आहे. शीतलता कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य मिटविणे, मुलांना निरोगी ठेवणे, खापदार्थाध्ये पोषक घटक टिकवून ठेवणे, लस दीर्घकाळ प्रभावी ठेवणे व अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत करते. उष्ण वातावरणाच्या विळख्यात असलेल्या 52 देशांतील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. शीतलतेच्या अभावामुळे समस्यांचा सामना करत असलेल्या 1.1 अब्ज लोकांपैकी 47 कोटी लोक गरीब ग्रामीण भागातील आहेत. सकस आहार व औषधे त्यांच्यासाठी दुरापास्त आहेत.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments