Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र

Webdunia
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (09:39 IST)
केंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात  इच्छाशक्तीचा अभाव असल्याची जोरदार टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. आपल्या देशात ऑगस्ट 2011 मध्ये जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली असा दावा हजारे यांनी केलाय, सोबतच शवासीयांच्या हिताच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती सबंधाने चालढकल करणे योग्य नाही असा सुद्धा सरकारला सुनावले आहे. आपल्या पत्रात हजारे म्हणतात, “लोकपाल, लोकायुक्त कायदा भ्रष्टाचार मुक्त हिंदुस्थानसाठी  निर्मितीसाठी एक क्रांतीकारक कायदा आहे. लोकपालची नियुक्ती करण्यात आली असती तर जनतेने पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची तक्रार केली तर ते पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्यांचे सर्व मंत्री, खासदार, आमदार वर्ग 1 ते 4 मधील  सर्व अधिकारी व कर्मचारी यांची पुराव्याच्या अधारावर चौकशी करू शकतात. पूर्वी सर्व अधिकार्‍यांना संपत्तीचा तपशील देणे बंधनकारक होते. खासदार, आमदार यांसारख्या लोकप्रतिनिधींना संपत्तीचा तपशील द्यावा लागत नव्हता. आता लोकपाल, लोकयुक्त कायद्यामध्ये लोकप्रतिनिधींना प्रत्येक वर्षी आपल्या संपत्तीचा तपशील द्यावा लागेल, ज्याप्रमाणे केंद्रात लोकपालास अधिकार आहेत. त्याच प्रमाणे लोकायुक्तास राज्यात अधिकार आहेत.”त्यामुळे हा कायदा क्रांतीकारी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments