Marathi Biodata Maker

Life after lockdown लॉकडाउन नंतर भारतीयांचे आयुष्य कसे असेल?

नवीन रंगियाल
शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (13:05 IST)
14 एप्रिल रोजी संपणाऱ्या 21 दिवसांच्या लॉकडाउनची मुदत वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजे आपले जीव वाचविण्यासाठी घरी आणखी काही दिवस राहावे लागणार आहे. बहुतेक लोकं प्रतीक्षा करीत आहे ते म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतर आपले आयुष्य कसे असणार.

1 ठराविक वेळेत उघडतील बाजार - लॉकडाउन संपल्यानंतर असे नाही की सर्व बाजारपेठ आणि शहरे एकत्र उघडतील आणि सर्वकाही पूर्वीसारखेच सामान्य होईल. काही सवलतीसह बाजारपेठ सुरू होतील. या सवलती दरम्यान, लोकांना बाहेर जाऊ देतील. या साठी शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
 
2 रेल्वेमधून प्रवास करणे सोपे नसणार - रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी आपल्याला बऱ्याच नियमांचे पालन करावे लागणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की रेल्वे सध्या उत्पन्नाचा विचार न करता प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत आहे. लॉकडाउन नंतर देखील सर्व प्रवासी तोंड बांधून असणार. अशी अपेक्षा बाळगतो.
 
3 तर रेल्वेने प्रवास करणे अशक्य - असे शक्य आहे की आरोग्य सेतू ऍपच्या साहाय्याने प्रवाशांची तपासणी केली जाईल. त्या तपासणीमध्ये कोणी प्रवाशी अस्वस्थ आढळल्यास त्याला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
 
4 थर्मल स्क्रीनिंग नंतर प्रवेश - विमानतळावर जसे प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. तश्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य असणार.
 
5 हॉट-स्पॉट त्वरित कळेल - कोरोना पासून मुक्त झालेली शहरे तर ठीक आहे पण ज्या शहरांची नावे हॉट स्पॉट म्हणून नोंदल्या आहे त्यांचा वर जातीने लक्ष दिले जाणार आहेत. अश्या शहरांमधे ट्रेनचे आवागमनच रद्द करण्यात येईल किंवा अश्या हॉट स्पॉट शहरांसाठी तिकीटच मिळणार नाही.
 
6 हॉटेलमध्ये स्क्रीनिंग करावी - आपल्याला काही कारणास्तव गावी जावे लागले आणि त्या शहरात एखाद्या हॉटेलात राहण्याची वेळ आली तर थर्मल स्क्रीनिंग केले जाऊ शकते आणि त्यात आपणास तापाचे निष्पन्न झाल्यास आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी मिळणार नाही.  
 
7 आजारी असल्यास कोणीलाही भेटता येणार नाही - या पूर्वी आपण आजारी असल्यावर लोकं आपणास भेटावयास यायचे. पण सध्याची एकंदरीत परिस्थिती बघून या पुढे आपणांस भेटावयास कोणीही येणार नाही. आपले आप्तेष्ट मित्र मंडळ आणि नातेवाईक आता आपल्या तब्येतीची विचारपूस फक्त फोनवरच करतील.
 
8 समारंभ किंवा उत्सव साजरा करता येणार नाही - आतापर्यंत आपण समारंभात खूप एन्जॉय केले असणार पण आता असे करणे शक्य नसणार. 10 किंवा त्याहून अधिक लोकं एकत्र आल्यास आपल्याला तशी परवानगी घ्यावी लागेल किंवा समारंभात येणाऱ्यांची चौकशी किंवा तपासणी केली जाऊ शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा कडक होणार, मद्यपी चालकांवर कडक कारवाईचे निर्देश-प्रताप सरनाईक

T20 World Cup टी-२० विश्वचषकादरम्यान टीम इंडियाचा खेळाडू संघ सोडून गेला

सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली

गोव्यात भीषण रस्ता अपघात; पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या कारला एसयूव्हीची धडक

LIVE: महाराष्ट्र सरकारने मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या

पुढील लेख
Show comments