Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिरुपतीचे नियोजन करताय, मंदिर पूर्ण बंद राहणार

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:34 IST)
तुम्ही तिरुपती बालाजीला जाणार आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वर्षात पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांना घेता येणार नाही. मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात तिरुपती बालाजी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा विचार तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) करत आहे. यामागे धार्मिक कारण आहे. प्रत्येक 12 वर्षांनी ‘अघमास’येतो त्यालाच ‘अस्ताबंधना बाललया महासंपरोकषनाम’असे देखील म्हटले जाते. ‘अघमास’ यंदा 12 ते 16 ऑगस्ट या काळात होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन हा निर्णय घेणार आहे. मंदिरात प्रत्येक दिवशी 30 ते 35 हजार भक्त दर्शनासाठी येतात. पण ‘अघमास’दरम्यानच्या सर्व पूजा आणि दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भक्तांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन करताना याचा विचार करावा, असे ‘टीटीडी’ने स्पष्ट केले आहे. देवस्थानाने या आधीच 12 ते 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व अर्जिता सेवा रद्द केल्या. त्यामुळे मंदिर बंद राहणार हे उघड आहे. 
 
होणाऱ्या हा धार्मिक विधी 1958 पासून करण्यात येत आहे. प्रत्येक 12 वर्षांनी होणारी ही विशेष पूजा आहे. तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबाला दिर्घ आयुष्य मिळावे, अशी प्रार्थना करण्यात येते.  तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व शक्ती एका पात्रात जमा होते. या काळात हे पात्र यज्ञशाळेत ठेवले जाते. ‘महासंपरोकषनाम’ची तयारी 20 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे. त्यामुळे नियोजन असेल तर विचार करा.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments