Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नी त्रस्त 54 पुरूषांची सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव

Webdunia
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (09:29 IST)
पती पिडीत महिला नेहमीच आपण ऐकतो आणि त्यावर पोलीस कारवाई सोबत कोर्टात अनेक केसेस आपण पाहत असतो, मात्र उस्मानाबाद येथे चक्क ५४ पत्नी पीडितांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. पतीसह सासरच्या मंडळींवर वेळोवेळी गुन्हे दाखल होत आले आहेत़ त्यात आता पत्नीच्या सततच्या कुरबुरीमुळे वैतागलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील 54 पुरूषांनी सामाजिक संस्थांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव घेतली असून, एकत्रित कुटुंबातून विभक्त राहणे, सतत संशय घेणे, मोबाईलमध्ये बिझी असणे, आदी कारणांनी आपण पत्नीमुळे त्रस्त झाल्याच्या तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला व मुलांकरिता सहाय्यता कक्षात वर्षभरात 33 पुरुषांनी अर्ज केले, वाशी तालुक्यातील ईट येथील डॉ. इक्बाल ग्रामविकास मंडळाच्या कक्षात 8 पत्नीपिडीतांनी तक्रारी केल्या आहेत. सोबतच कळंब येथील लोकप्रतिष्ठाण संस्था उस्मानाबाद संस्थेकडे 8 पत्नीपीडितांनी अर्ज दाखल केले आहेत. उमरगा येथील त्रिरत्न महिला बहुउद्देशिय संस्थेकडे 5 पुरुषांनी वर्षभरात तक्रारी केल्या आहेत़ असे समोर आले आहे. पिडीतानी तक्रार केल्या पत्नी सतत माहेरी जाते, सासू- सासऱ्यापासून विभक्त राहण्याचा तकादा लावते, सतत संशय घेते, पत्नीकडून चार चौघांत शिवगाळ करते, अपमान करणे आणि सोशलमिडीयाच्या दुनियेत नेहमीच बिझी रहात राहत फेसबुक, व्हॉट्सअप वापरत मोबाईलमध्ये तासन तास व्यस्त राहत आहे. त्यामुळे आता फक्त महिला अत्याचार नाही तर पुरुष अत्याचार याकडे देखील लक्ष दिले पाहिजे असे समोर येते आहे.

संबंधित माहिती

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments