Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान?

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (10:17 IST)
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. तर त्याहून अधिक लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 80 लोकसभा उत्तर प्रदेशात आहेत. ज्यामुळे त्या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. मुंबईत महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
महाराष्ट्रात असे होईल मतदान…
पहिला टप्पा (19 एप्रिल 2024) :
नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर
 
दुसरा टप्पा (26 एप्रिल 2024) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी
 
तिसरा टप्पा (07 मे 2024) :
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
 
चौथा टप्पा (13 मे 2024) :
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
 
पाचवा टप्पा (20 मे 2024)
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी कुटुंबासह महाकुंभ त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कृषीमंत्र्यांचे कक्ष बांधले जातील-कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

कोट्टायम नर्सिंग कॉलेज रॅगिंग प्रकरणी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक निलंबित, पाच विद्यार्थ्यांना आधीच अटक

ठाण्यात नैराश्याने ग्रस्त एका व्यक्तीने केली आत्महत्या

महाराष्ट्रात जीबीएसच्या रुग्णांची संख्या २०७ वर पोहोचली

पुढील लेख
Show comments