Festival Posters

निगेटिव्ह सर्व्हे आल्यानं श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित नाही- वरूण सरदेसाईं

Webdunia
शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (09:08 IST)
कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्व्हे केला केलेला. सर्व्हे हा निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दिली आहे.
 
डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिला असून त्या विजय होतील असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
 
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले याबाबत बोलताना सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या १३ पैकी सात खासदारांची तिकीटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. तसेच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची आठवण येत असेल. २०१४ आणि २०१९ साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले जायचे. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे रश्मी वहिनी औक्षण करून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायच्या. आता दहा तास वेटिंग करावे लागते. त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही. मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताच त्यांचे स्थान यांची सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असं म्हणणाऱ्यांना दुप्पट जागा देखील मिळाल्या नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी २१ उमेदवारांची घोषणा केली आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments