Festival Posters

शरद आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? काय म्हणाले नवाब मालिक..

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (15:23 IST)
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 20नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार विविध मतदार संघातून उभे केले आहे. भाजपचे विरोध असताना राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटातून मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे. मालिक यांनी मानखुर्द मतदार संघातून उमेदवारी दाखल केली.

महायुतीमध्ये नवाब मलिकांच्या तिकिटावरून गोंधळ झाला असून नवाब मालिक यांना उमेदवारी बद्दल प्र्श्न विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही उमेदवाराला 4फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. मी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणुन निवडणुकीसाठी उभा आहे. नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द मतदार संघातून अबू आजमी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. 
 
नवाब मलिक यांना अजित दादा पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? असा प्र्श्न विचारल्यावर ते म्हणाले, मी तुरुंगात असताना अजित दादा पवार यानी मला आणि माझ्या कुटुंबियांना नेहमीच मदत केली. म्हणुन मी त्यांनी वेगळा पक्ष केल्यावर मी त्यांच्या सोबत आलो. 
<

मुंबई: क्या अजित पवार और शरद पवार फिर से एक हो सकते हैं, इस सवाल पर एनसीपी नेता और मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार नवाब मलिक ने कहा "लाठी मारने से पानी अलग नहीं होता। महाराष्ट्र की जनता और कार्यकर्ता चाहते हैं कि परिवार के दोनों नेता एक साथ आएं लेकिन यह निर्णय… pic.twitter.com/jxxHFdvn5G

— IANS Hindi (@IANSKhabar) November 13, 2024 >
शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे यांच्याशी देखील माझे चांगले संबंध आहे. माझ्या जावयाच्या अपघाता वेळी सुप्रिया ताईंचा फोन आला होता. पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्र्श्न विचारल्यावर ते म्हणाले कोणतेही कुटुंब तुटू नये अशी सर्वांची इच्छा आहे. हे सर्व घडत असताना मी तुरुंगात होतो . लाठीने पाण्यात मारल्याने पाणी वेगळे होत नाही, लोक लाठी मारत राहतात, कधी कधी पाणी पुन्हा जमा होते.
महाराष्ट्रातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे.कधीतरी पवार कुटुंबीयही एकत्र येण्याची शक्यता आहे.मात्र हा निर्णय पवार साहेब आणि अजित दादांना घ्यायचा आहे.
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments