Marathi Biodata Maker

रांजणगावाचा महागणपती

Webdunia
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (07:15 IST)
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
 
मंदिर
रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 
सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.
 
पौराणिक कथा
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

मनोज बाजपेयी यांच्या अडचणी वाढल्या, लखनौनंतर आता मेरठमध्ये कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली

अष्टविनायक यात्रा करायची आहे? पाहा सर्वात सोपा मार्ग आणि प्रवासाचे योग्य नियोजन

अभिनेता-राजकारणी विजय थलापतीच्या अडचणी वाढल्या, दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला

"घूसघोर पंडत" विरुद्ध योगी सरकारने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले; मायावती ब्राह्मणांबद्दल काय म्हटले?

बजेटचे पडसाद: कामवाली बाईला मालकीणने कसे अकडवले

पुढील लेख
Show comments