Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळाच्या झळा!

वेबदुनिया
WD
उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येत रोज २० ची भर पडत आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या ७ लाखांवर तर रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ३ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे पुढील २ महिने युद्धपातळीवर दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगितले. जनावरांच्या चा-यासाठी दिल्या जाणा-या अनुदानात वाढ करण्याचा, जनावरांच्या छावण्यांशेजारी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचा तसेच टँकरसाठी तालुका स्तरावर निविदा काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देतानाच अभयारण्यातील वन्य पशुंनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीच्या बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर पंधरा दिवसाला टँकरच्या संख्येत ३०० नी भर पडत असून जून पर्यंत टँकरची संख्या ७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा तालुका स्तरांवर काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळामुळे प्रशासकीय खर्चातही वाढ झाली असून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम व पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढील दोन महिन्यांचा कालावधी कठीण असेल असे सुतोवाच केले.
- See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=71042&cat=Mainpage#sthash.2WB0w7WJ.dpu f
सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Show comments