Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळाच्या झळा!

वेबदुनिया
WD
उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येत रोज २० ची भर पडत आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या ७ लाखांवर तर रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ३ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे पुढील २ महिने युद्धपातळीवर दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगितले. जनावरांच्या चा-यासाठी दिल्या जाणा-या अनुदानात वाढ करण्याचा, जनावरांच्या छावण्यांशेजारी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचा तसेच टँकरसाठी तालुका स्तरावर निविदा काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देतानाच अभयारण्यातील वन्य पशुंनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीच्या बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर पंधरा दिवसाला टँकरच्या संख्येत ३०० नी भर पडत असून जून पर्यंत टँकरची संख्या ७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा तालुका स्तरांवर काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळामुळे प्रशासकीय खर्चातही वाढ झाली असून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम व पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढील दोन महिन्यांचा कालावधी कठीण असेल असे सुतोवाच केले.
- See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=71042&cat=Mainpage#sthash.2WB0w7WJ.dpu f

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments