Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ते विधानसभेत आणि मी रस्‍त्यावरः राज

Webdunia
'' साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही
PR
तेवढी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. आजवर रस्‍त्‍यावरून मांडलेले मुद्दे आता माझ्या आमदारांकरवी विधानसभेवर मांडले जातील आणि बाकीचं बघायला मी रस्‍त्यावर आहेच'', हे बोल आहेत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांचे.

पहिल्‍याच विधानसभा निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळविल्‍यानंतर आणि नाशिक, पुण्‍यासह मुंबईवरही आपले वर्चस्‍व सिध्‍द केल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी ते म्हणाले, की माझ्या पक्षाचे यश हे मी मांडलेला मुद्दा आणि मराठीसाठी दिलेल्‍या लढ्याला आलेले यश आहे. राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलण्‍यास सुरूवात झाली असून आगामी पाच-सहा वर्षांत त्‍यात मोठा बदल झालेला दिसेल हे निश्चित.

शिवसेनेसंदर्भात कुठल्‍याही प्रश्‍नाचे उत्तर देणार नाही असे म्हणतानाच रामदास कदम यांना खरेतर गुहागरमधून उमेदवारी देण्‍याची गरज नव्‍हती असे मत मांडून त्‍यांनी नवी 'खेळी' खेळली आहे.

निकाल जाहीर झाल्‍यानंतर बाळासाहेबांशी कुठल्‍याही प्रकारचे बोलणे झालेले नसून त्‍यांचा आशिर्वाद घेण्‍यासाठी मातोश्रीवर जाणार नसल्‍याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments