rashifal-2026

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही- विलासराव

वेबदुनिया
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (16:13 IST)
ND
ND
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या माघारीने अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

देशमुखांनी आज कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न आता हायकमांडच्या पारड्यात असल्याचे सांगितले. देशमुखांच्या या भूमिकेने अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्रिपदावरचा दावा बळकट झाला आहे. जेमतेम दहा महिन्यांची कारकिर्द लाभलेल्या चव्हाणांनी आपण इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले असले तरी निर्णय हायकमांडच घेईल, असे सांगून कॉंग्रेसी संस्कृतीचेच आपण पाईक असल्याचे दाखवून दिले आहे.

त्याचवेळी विलासरावांनी आज घेतलेली माघार चव्हाणांना पुढे चाल देत राणेंना रोखण्याची खेळी असल्याचे मानले जात आहे. या मोबदल्यात देशमुखांचे चिरंजीव व यंदाच आमदार झालेले अमित देशमुख यांना किमान राज्यमंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

Show comments