परमेश्वराच्या दिशेने एक जरी पाऊल टाकले, तरी तो आपल्या दिशेने दहा पावलं टाकल्याशिवाय रहात नाही. महादेव, भोळासांब, असला तरी भावाचा भुकेला आहे. भक्तजण जर आपल्या छोट्या क्षुद्र इच्छा पूर्ण होण्यासाठीच फक्त त्याला बेलफूल वहात असतील, तर त्याला भक्तांपासून दूर कुठेतरी पळून जावेसे वाटणे साहजिकच आहे. आपल्या जवळ असणारा ठेवा आपल्या जवळच ठेवण्याची किल्ली त्याने कधीच आपल्या सुपूर्द केली आहे. ती योग्य वेळी योग्य ठिकाणी लावण्याची दक्षता फक्त आपण घेतली म्हणजे झाले.