Festival Posters

कस्तूरबांचे प्रेरणास्थान- बापू

Webdunia
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे एक तत्त्व होते, ते जे काही सांगत ते आधी स्वत: कृतीत आणत. त्यांच्या संदर्भातील असे अनेक प्रसंग आजही प्रेरक ठरत आहेत. गांधीजींची पत्‍नी कस्तुरबा यांच्यासाठी तर ते प्रेरणास्थानच होते. 

कस्तुरबा नेहमी आजारी राहत. एके दिवशी गांधीजींनी त्यांना एक सल्ला दिला, की 'तुम्ही मीठ खाणे सोडून दिले पाहिजे. तुम्ही लवकर बर्‍या व्हाल.' यावर कस्तुरबाजींनी उत्तर दिले, 'मीठा विना अन्नाला काय चव राहणार?'

गांधीजी बोलले 'मीठ आधी सोडून तर बघा!' कस्तूरबाजी त्यावर म्हणाल्या, 'तुम्ही मीठाचा त्याग करू शकता?' गांधीजींनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता 'हे घ्या केला मीठाचा त्याग !' असा त्यांच्यासमोर संकल्प केला. तेव्हापासून मीठ काय असते, हे त्यांना माहीत नव्हते. गांधीजी आधी कृती करायचे आणि त्यानंतर समोरच्याला सांगायचे. त्यांच्यासाठी ते स्वत:च प्रेरक होते.

सांगण्याचे तात्पर्य हेच की, व्यक्तीला आज जे काही आजार आहेत ते मीठाचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने होतात. डॉक्टरांनीही हे मान्य केले आहे. डॉक्टर तर सांगतात की, जेवणात मीठाचा वापर चवीपुरताच केला पाहिजे. जेवणात वरून मीठ घेण्याची काही आवश्यकता नाही. ते आरोग्यास हानीकारक आहे. फळे व हिरव्या पालेभाज्यांमध्येही क्षार असतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पाहिजे त्या प्रमाणात मीठ मिळत असते. त्याचप्रमाणे कोणी साखर व त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचे अतिसेवन करतात. त्यामुळेही ते अनेक आजारांनी त्रस्त असतात. अधिक चहा व मादक द्रव्यांचे सेवन करून आपणच स्वत: आजाराला आमंत्रित करून 'आ बैल मुझे मार' ही म्हण सत्य करून दाखवतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

भाजप की शिवसेना, मुंबईचा नवा महापौर कोण होणार? ११ फेब्रुवारी रोजी निर्णय

मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, एअर इंडिया आणि इंडिगो विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

LIVE: मुंबईला लागून असलेल्या तीन शहरांमध्ये महायुतीचे वर्चस्व

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होईल

पुढील लेख
Show comments