Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कस्तूरबांचे प्रेरणास्थान- बापू

Webdunia
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे एक तत्त्व होते, ते जे काही सांगत ते आधी स्वत: कृतीत आणत. त्यांच्या संदर्भातील असे अनेक प्रसंग आजही प्रेरक ठरत आहेत. गांधीजींची पत्‍नी कस्तुरबा यांच्यासाठी तर ते प्रेरणास्थानच होते. 

कस्तुरबा नेहमी आजारी राहत. एके दिवशी गांधीजींनी त्यांना एक सल्ला दिला, की 'तुम्ही मीठ खाणे सोडून दिले पाहिजे. तुम्ही लवकर बर्‍या व्हाल.' यावर कस्तुरबाजींनी उत्तर दिले, 'मीठा विना अन्नाला काय चव राहणार?'

गांधीजी बोलले 'मीठ आधी सोडून तर बघा!' कस्तूरबाजी त्यावर म्हणाल्या, 'तुम्ही मीठाचा त्याग करू शकता?' गांधीजींनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता 'हे घ्या केला मीठाचा त्याग !' असा त्यांच्यासमोर संकल्प केला. तेव्हापासून मीठ काय असते, हे त्यांना माहीत नव्हते. गांधीजी आधी कृती करायचे आणि त्यानंतर समोरच्याला सांगायचे. त्यांच्यासाठी ते स्वत:च प्रेरक होते.

सांगण्याचे तात्पर्य हेच की, व्यक्तीला आज जे काही आजार आहेत ते मीठाचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने होतात. डॉक्टरांनीही हे मान्य केले आहे. डॉक्टर तर सांगतात की, जेवणात मीठाचा वापर चवीपुरताच केला पाहिजे. जेवणात वरून मीठ घेण्याची काही आवश्यकता नाही. ते आरोग्यास हानीकारक आहे. फळे व हिरव्या पालेभाज्यांमध्येही क्षार असतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पाहिजे त्या प्रमाणात मीठ मिळत असते. त्याचप्रमाणे कोणी साखर व त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचे अतिसेवन करतात. त्यामुळेही ते अनेक आजारांनी त्रस्त असतात. अधिक चहा व मादक द्रव्यांचे सेवन करून आपणच स्वत: आजाराला आमंत्रित करून 'आ बैल मुझे मार' ही म्हण सत्य करून दाखवतो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments