Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची

वेबदुनिया
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. पण त्या आधीही म्हणजे २० जानेवारीलाही दिल्लीतच प्रार्थना सभेतच त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पण सुदैवाने तो अयशस्वी ठरला होता. हल्लेखोराने त्यावेळी हातगोळाही फेकला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात गांधीजी मारले जावेत अशी त्याची योजना होती. 

गांधीजी त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेत लोकांशी बोलत होते. पण मायक्रोफोन नीट काम करत नव्हता. त्यामुळे गांधीजींचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. सुशीला नायर त्यांचे म्हणणे पुन्हा एकदा मोठ्या आवाजात लोकांपर्यंत पोहचवित होत्या. त्याचवेळी स्फोटाचा जोरदार आवाज झाला.

या स्फोटानंतरही गांधीजी अविचल होते. घाबरलेल्या मनू गांधींना त्यांनी विचारलेही 'तुम्ही एवढे घाबरताय का? इथल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बंदुक चालवायचे प्रशिक्षण दिले जात असावे. खरोखरच तुम्हाला गोळी घालायला कुणी आलात तर मग काय कराल? अधिक चौकशीनंतर कळले, गांधीजींच्या जवळ म्हणजे ७५ फूटावर गन कॉटनचा स्फोट घडविण्यात आला होता.

या स्फोटाचा उद्देश लोकांचे लक्ष विचलीत व्हावे हा होता. या स्फोटानंतर त्यांची हत्या करू इच्छिणार्‍यांना गांधीजींच्या मागे असलेल्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी हातगोळा फेकायचा होता. पण तो सिद्धीस जाऊ शकला नाही. पहिल्या स्फोटानंतर दिगंबर बाजे यास गांधीजींवर हातगोळा फेकायचा होता. पण आयत्या वेळी त्याने कच खाल्ली.

या हत्या कटात नथूराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, दिगंबर बाजे व शंकर किस्तायत यांचा समावेश होता. कट अयशस्वी ठरल्यानंतर ही मंडळी टॅक्सीत बसून फरारी झाली. पण त्यांच्यातला एक मदनलाल पाहवा यास पकडण्यात आले.

या प्रार्थनासभेत गांधीजी स्वातंत्र्य व विभाजनानंतर आलेल्या निर्वासितांची स्थिती तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मतभेदाविषयी चर्चा करत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू

पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू,वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे 3,560 गुन्हे दाखल

दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होणार नाही, द्वारका एक्सप्रेसवेवर बोगदा तयार नितीन गडकरींनी दिली माहिती

वक्फ सुधारणा कायद्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय 15 एप्रिल रोजी याचिकांवर सुनावणी करू शकते

वर्ध्यात भाजपच्या माजी खासदाराला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढील लेख
Show comments