Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संक्रमणः अंधाराकडून प्रकाशाकडे

Webdunia
सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. 

' तमसो मा ज्योतिर्गमय'
' अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणे' ही वैदिक ऋषींची शिकवण या दिवशीच प्रयत्नांनी साकार होते. या दिवशीच कर्मयोगी सूर्य अंधकारावर आक्रमण करण्याचा दृढ संकल्प करतो. या दिवसानंतर अंध:कार हळूहळू कमी होत जातो. या दिवसापासून चांगले काम करण्यासाठी शुभ दिवसांची सुरवात होते. म्हणूनच मकर संक्रांतीनंतरच आपला मृत्यू यावा असे अनेक वृद्धांना वाटते. यमराजाला उत्तरायण आरंभ होईपर्यंत थांबवणार्‍या भीष्म पितामह याचे उदाहरण ज्वलंत आहे.

शुक्ल पक्ष अग्नी, ज्योती व प्रकाश याने तर कृष्ण पक्ष अंधकाराने युक्त असतो. या दृष्टीने बघितले तर उत्तरायणामध्ये मृत्यू येणे हे तेजस्वी समजले जाते. काळे व भीतिदायक जीवन मनुष्याला नित्कृष्ट मृत्यूकडे घेऊन जाते.

प्रकाशाचा अंधारावर विज य
मानवी जीवन प्रकाश व अंधाराने भरलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढर्‍या तंतूंनी बनलेले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, कुसंस्कार ही अंध:काराचे प्रतीके आहेत. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे, कुसंस्काराकडून संस्कारांकडे जाणे हीच मानव जीवनातील संक्रांत ठरेल.

  WD
संक्रांत म्हणजे क्रांत ी
क्रांतीत फक्त परिस्थिती परिवर्तनाची अपेक्षा असते. पण संक्रांतीत परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी फक्त संदर्भच नव्हे तर मानवी मनातील संकल्पही बदलायला हवेत. हे काम फक्त क्रांतीनेच शक्य आहे. क्रांतीत हिंसेला महत्त्व असते. पण संक्रांतीत समजूतदारपणाला महत्त्व आहे. अहिंसेचा अर्थ 'प्रेम करणे' असा होतो. संक्रांतीचा अर्थ डोके उडविणे असा नव्हे तर डोक्यातील विचारांना बदलविणे असा होतो.

संक्रांती म्हणजे संगक्रांती
या दिवशी मानवाला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या विकारांतून मुक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा. मुक्त जीवन जगणार्‍या लोकांची संगत धरावी. असेच लोक क्रांतीला योग्य दिशा व मार्ग दाखविण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात.

संक्रांती म्हणजेच संघक्रांत ी
कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी संघाची आवश्यकता असते. 'संघे शक्ती कलौ युगे' संघाने विशिष्ट शक्ती निर्माण होते. या विशाल जगात कोणतेही काम एकटा मनुष्य करू शकत नाही. त्याची शक्ती मर्यादित असते. संघात जास्त प्रमाणात शक्ती असते. ही शक्ती कोणतेही काम सहज शक्य करते.

या सणाच्या निमित्ताने परिचित लोकांकडे जाणे जुनी भांडणे विसरून, नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्यासाठी ही छान संधी असते.  

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments