Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली, किंमत शंभरीपार

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (11:29 IST)
नवी मुंबई- तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होत आहे यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले आहेत तर टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात दिसत आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे अशात भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ सामान्यांचा खिसा रिकामा करत आहे.  
 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 592 ट्रक व टेम्पोमधून 2718 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे तर जवळपास 5 लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी चाळीस ते साठ रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर साठ ते शंभर रुपये झाले आहेत.
 
किरकोळ मार्केटमध्ये फरसबी 120 रुपये किलोवर गेली आहे. वाटाणाही किरकोळ मार्केटमध्ये शंभर रुपये किलो दराने विकला जात आहे. गवारचे दर घसरुन तीस ते साठ रुपयांवर आले आहेत. भेंडीचे दरही नियंत्रणात आहे. 
 
तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments