Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील पहिली घटना सोशल मिडीयाचा गैर वापर काही काळ पूर्ण जिल्हाभराचे इंटरनेट बंद

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (14:06 IST)
सोशल मिडिया इतका घातक ठरू शकतो याचे उधाहरण सध्या नाशिक आहे. सोशल मिडिया वरील अफवेमुळे तळेगाव येथील आंदोलन हिंस्र झाले. त्यात जवळपास कोटींचे नुकसान झाले असून हजारो लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. तर येऊ घातलेला दसरा आणि मोहरम या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी प्रथमच देशात आणि महाराष्ट्रात मोबाईल आणि इतर इंटरनेट सेवा पोलिसांनी बंद करायला सांगितली असून ती बंद झाली आहे.
 
तळेगाव येथील आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अनेकदा सागितले की सोशल मिडिया वापरू नका  परंतु कोणीही हे न ऐकता आक्षेपार्ह मजकुरासह आंदोलनाचे अनेक फोटो व्हिडियो ग्रुपवर टाकणे सुरुच होते. एकूणच परिस्थिती बघता संपर्काचे प्रभावी माध्यम समजल्या जाणारी इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याची प्रकारे अफवा पसरवू नयेत किंवा अफवा पसरवून शांतता भंग करू नये असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मोबाईल कंपन्यानी बंद ठेवून पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आता नाशिक मधील लाखो लोकांचे नेट कमीत कमी तीन दिवस बंद राहणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

चीन आणि पाकिस्तानचा एकमेकांवरील विश्वास डळमळीत झालाय का?

राज्यातील या जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, आयपीएस अधिकारी निलंबित

सर्व पहा

नवीन

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचे आदेश, जाणून घ्या आत्तापर्यंत काय काय घडलं?

अजित पवार गटाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा, शरद पवार म्हणाले-

भावाकडून बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या,आरोपीला अटक

Prajwal Revanna: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी आणखी एक एफआयआर दाखल

लोकसभेत असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ओवेसींनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, संसदेत गदारोळ

पुढील लेख
Show comments