Marathi Biodata Maker

मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत काढण्यात येणार

Webdunia
गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (08:35 IST)
मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. केंद्रीय आरक्षण आणि आरक्षणाचा टक्का वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा मार्चा काढण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन जाहीर होताच आंदोलनाची तारीख घोषित केली जाणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील मुख्यहस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व समन्वयक किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
यावेळी पुढे राजेंद्र दाते पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग समितीची स्थापना केली होती. या समितीने वर्षभर अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यानुसार यापूर्वीच्या राज्य सरकारने एसईबीसी कायदा २०१८ हा मंजूर केला होता. या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. परंतु ४१ दिवसांच्या लढ्यानंतर उच्च न्यायालयाने मराठ समाजाचे आरक्षण कायम ठेवले होते. 
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यात आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. यावर सध्या सुनावणी सुरू असून आता १०२ आणि १०३ च्या घटना दुरुस्तीमुळे १० टक्के अधिकचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाची जी ५० टक्क्यांची मर्यादा होती, ती वाढली असून त्यामुळे मराठा आरक्षणाविरोधातील सर्व दावे दूर होणार आहेत, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून नार्को चाचणीचे आदेश द्यावेत, माजी मंत्र्यांची मोठी मागणी

LIVE: अश्विनी भिडे बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्या

विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा, अशोक खरात अधिकाऱ्यांसोबत संबंधात होते

प्रीती-दीपक यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजयाने सुरुवात केली, निखत-लोव्हलिना यांना बाय मिळाला

RR vs CSK:राजस्थानने चेन्नईला आठ गडी राखून हरवले, वैभवने अर्धशतक झळकावले

पुढील लेख
Show comments