Dharma Sangrah

Maratha Reservation :मराठा आरक्षणासाठी दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (13:03 IST)
सध्या मराठा आरक्षण मिळावं या साठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सगे सोयरे अध्यादेश लागू व्हावे या साठी मनोज जरांगे हे जालनाच्या आंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. पहिली घटना जालन्यातील तालुका आंबाडच्या चिकनगावात घडली आहे.

येथे संदीपान आनंदराव चौधरी वय वर्षे 41 यांनी लोणारच्या भायगाव शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर त्यांनी लिहिलेल्या चिट्ठीत मनोज जरांगे यांची तब्बेत बरी नाही. शासन या कडे लक्ष देत नाही. आरक्षणावर अद्याप कुठला ही निर्णय घेत नाही. मी आपले जीवन संपवीत आहे शासनाने मराठा आरक्षणावर निर्णय द्यावे. असे लिहिले आहे. संदीपान यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. 

तर दुसरी घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. येथे फुलंब्री तालुक्यात गणोरी येथील गजानन नारायण जाधव वय वर्ष 18 या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. गजानन हा निधोना येथे प्रभात हायस्कुल विद्यालयात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या तरुणाने एकच 'मिशन मराठा आरक्षण' मराठा आरक्षण मिळत नसल्याने मी ही टोकाची भूमिका घेत आहे. असे चिट्ठीत लिहून गळफास घेतला आहे. 

Edited By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments