Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिंबाचे लहान सहानं तांत्रिक उपाय

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:43 IST)
1) एखाद्या दृष्ट लागल्यानंतर त्याच्या चालू असलेला व्यापार बंद होऊन जातो, पैशाची चणचण होते, आरोग्यसंबंधी तक्रार सुरू होतात. या सर्व कारणांपासून बचाव करण्यासाठी दुकान व घराबाहेर लिंबू आणि मिरची लटकवण्यात येते. असे केल्याने लिंबू मिरची बघितल्यानेसुद्धा लिंबाचा आंबटपणा व मिरचीचा तिखटपणा दृष्ट लावणार्‍या व्यक्तीची एकाग्रता भंग करून देतो. ज्याने तो जास्त वेळापर्यंत घर किंवा दुकानाल बघू शकत नाही.  
 
2) तुम्ही रास्त्याने जाताना बर्‍याच वेळा तुम्हाला तेथे लिंबू आणि मिरची पडलेली दिसते किंवा चौरस्ता किंवा तिरंस्त्यावर तुम्हाला लिंबू किंवा लिंबाचे तुकडे पडलेले दिसतात, तर त्यावर पाय देणे टाळावे. असे ही शक्य आहे की असल्याप्रकाराच्या लिंबाचा प्रयोग एखाद्या तोटक्यासाठी करण्यात आला असावा. त्याच्या तुमच्यावर वाईट परिणाम पडतो.  
 
3) तंत्र-मंत्रात लिंबू, टरबूज, कांढरा भोपळा आणि मिरचीचा विशेष प्रयोग केला जातो. सामान्यत: लिंबाचा प्रयोग  वाईट नजरपासून बचाव करण्यासाठी केला जातो. वाईट नजर अर्थात जेव्हा एखादा व्यक्ती दुकान, एखादी वस्तू किंवा एखाद्या मुलाला व माणसाकडे अधिक वेळापर्यंत बघतो तर त्याची वाईट नजर त्याला लागते.  
 
4) ज्या घरात लिंबाचे झाड असतात त्यात घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा सक्रीय होत नाही. लिंबाच्या वृक्षाच्या जवळपासचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. त्याच बरोबर वास्तुनूसार लिंबाचे झाडं घरात असेलेले वास्तू दोष देखील दूर करतो.  
 
5) जर एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय उत्तम  चालत नसेल तर त्याला शनिवारी लिंबाचा प्रयोग करायला पाहिजे. उपायानुसार एका लिंबाला दुकानाच्या चारीबाजूने स्पर्श करवून घ्यावे. त्यानंतर लिंबाचे चार तुकडे करावे आणि चारी दिशांमध्ये लिंबाचा एक-एक तुकडा फेकून द्यावा.  यामुळे दुकानातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होईल.  
7) जर एखाद्या मुलाला किंवा मोठ्या माणसाला वाईट नजर लागली असेल तर घरातील इतर व्यक्ती पीडित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा लिंबू फिरवून घ्यावे. त्यानंतर लिंबाचे चार तुकडे करून एखाद्या सुनसान जागेवर किंवा तिरस्त्यावर फेकावे. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे लिंबाचे तुकडे फेकल्यानंतर मागे वळून बघायचे नसते.  
 
8) जर तुम्हाला भरपूर श्रम केल्यानंतर देखील यश मिळत नसेल किंवा एखाद्या महत्वाच्या कामात यश मिळत नसेल तर मारुतीच्या देवळात आपल्या सोबत एक लिंबू आणि 4 लवंगा घेऊन जा. त्यानंतर देवळात पोहोचल्यानंतर त्या लिंबावर 4 लवंगा लावून द्या. मग नंतर मारुतीच्या मंत्रांचा जप करावा. व डोळे बंद करून मारुती समोर प्रत्येक कार्यात यश मिळू दे अशी प्रार्थन करायला पाहिजे आणि त्या लिंबाला घेऊन कार्य करावे. मेहनतीसोबतच कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढून जाते.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments