Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (11:26 IST)
चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. आता या निर्णयापाठोपाठ मोदी सरकार आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून नोटाबंदीनंतर नाणेबंदी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचे उत्पादन केले जाते. मात्र या चारही टांकसाळमध्ये मंगळवारपासून नाण्यांचे उत्पादन करणे बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे आरबीआयच्या स्टोअरमध्ये नाण्यांचा भरमसाठ अतिरिक्त साठा झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने 500 आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले होते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितले होते. या नोटा बंद केल्यानंतर सरकारनेनव्या 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता नाणेबंदी केली जात असल्याचे मानले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिला इन्फ्लूएंसरने कुत्र्यासोबत संबध ठेवले, व्हिडिओही व्हायरल झाला

मध्य प्रदेशातील उज्जैनसह १९ धार्मिक स्थळांवर आज मध्यरात्रीपासून दारूबंदी

रतन टाटा यांचे मृत्युपत्र : Ratan Tata यांनी संपत्तीचा मोठा भाग दान केला, कोणाला काय मिळाले ते पहा

LIVE: महाराष्ट्रात काही भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

ठाणे: दोन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर चाकूहल्ला, मृतदेह नदीत फेकून दिला

पुढील लेख
Show comments