Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Reliance JIO आणि Bharti Airtel यांच्यात विशेष करार झाला, ग्राहकांना काय फायदा होईल हे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 7 एप्रिल 2021 (07:51 IST)
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) ने भारती एअरटेल लिमिटेड (Bharti Airtel) बरोबर स्पेक्ट्रम-ट्रेडिंग कराराद्वारे आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई सर्कलच्या 800 मेगाहर्ट्झ बँडमधील स्पेक्ट्रमचे हक्क विकत घेतले आहेत. रिलायन्स जेआयओ 800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये आंध्र प्रदेशात 3.75, दिल्लीत 1.25 आणि मुंबईत 2.50 मेगाहर्ट्झचा वापर करून आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा प्रदान करू शकेल. रिलायन्स जिओकडे या तीन सर्कलमध्ये एकूण 7.5 मेगाहर्ट्झ अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध असेल.
 
सर्व मंजुरीनंतरच या कराराची अंमलबजावणी होईल
दूरसंचार विभाग (DoT) ने जारी केलेल्या स्पेक्ट्रम ट्रेडिंगच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा व्यापार करार झाला आहे. दोन्ही टेलिकॉम कंपन्यांमधील करार सर्व नियामक व वैधानिक मंजुरीनंतरच लागू होईल. रिलायन्स जिओ स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी एकूण 1,497 कोटी रुपये देईल. यात डिफर्ड पेमेंट अंतर्गत अडजस्ट केलेल्या 459   कोटींच्या पेमेंटचा समावेश आहे.
 
स्पेक्ट्रमच्या वापरासाठी झालेल्या या करारानंतर रिलायन्स जिओचे मुंबई सर्कलच्या 800MHz बँडमध्ये 2X15MHz स्पेक्ट्रम आणि आंध्र प्रदेश आणि दिल्ली सर्कलमधील 800MHz  बँडमध्ये 2X10MHz  स्पेक्ट्रम असेल. याद्वारे या मंडळांमधील स्पेक्ट्रमवर आधारित ग्राहक सेवा पूर्वीपेक्षा अधिक बळकट केली जाईल. अशी अपेक्षा आहे की नवीन स्पेक्ट्रमची भर पडल्यास रिलायन्स जिओची पायाभूत सुविधा आणि नेटवर्क क्षमता पूर्वीपेक्षा चांगली होईल.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments