Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरबीआयच्या नव्या नियमामुळे देशातील अर्ध्यांहून जास्त ATM बंद होणार?

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (10:52 IST)
आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात एटीएम मशीनबाबत काही नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. या कारणामुळे सर्व बँकांना आणि एटीएम मशीनमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागत आहे. हे बदल करण्यासाठी बँकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने, काही बँकांनी एटीएम मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी बँकांचे एटीएम बंद करण्यात आले आहे. असं असलं तरीही, एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
काय आहे आरबीआयचे एटीएमबाबत नवे नियम काय?
 
सर्व एटीएममध्ये दरवेळी 100 करोडपेक्षा जास्त रक्कम असणं गरजेचं आहे.
एटीएममध्ये सीसीटिव्ही, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन आणि हुटर्स असणं अनिर्वाय आहे.
सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.
एटीएममध्ये पैशांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणे गरजेचं आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments