Festival Posters

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

Webdunia
शुक्रवार, 25 मे 2018 (09:00 IST)
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक संघाने कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला, याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. पगार वाढीसाठी ५ मे २०१८ रोजी बैठक झाली, बैठकीत बँक संघाने २ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल ३ च्या अधिकाऱ्यांपर्यंत ही वाढ मर्यादीत असेल. 
 
बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप ३० मे रोजी सकाळी ६ पासून सुरू होईल. १ जून सकाळी ६ पर्यंत हा संप असेल.  
 
युनायटेड फोरम आणि बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय की, एनपीएमुळे बँकांचं जे नुकसान झालं आहे, त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. बँक कर्मचाऱ्यांना मागील २ ते ३ वर्षापासून जनधन योजना, नोटबंदी, मुद्रा आणि अटल पेन्शन योजना या केंद्राच्या प्रमुख योजनांमुळे रात्रंदिवस काम करावं लागलं. या योजनांच्या कामाचा बोझा निश्चितच बँक कर्मचाऱ्यांवर पडला आहे, असं तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे.बँक कर्मचाऱ्यांना मागील पगार वाढीत १५ टक्के वाढ करण्यात आली होती, ही पगार समिक्षा १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१७ साठी होती. यूएफबी ९ श्रमिक संघटनेची कार्यकारिणी आहे. यात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशन, तसेच नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स सामिल आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नवा किताब बहाल केला

अजित पवार यांचा विमान अपघात एक सुनियोजित कट; झिरो एफआयआरमध्ये दावा

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली

सरकारी आणि खाजगी शाळांचे ऑडिट होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

थॉमस कपमध्ये भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व लक्ष्य सेन करणार तर उबर कपची जबाबदारी पीव्ही सिंधू सांभाळणार

पुढील लेख
Show comments