Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी ! एटीएममध्ये पैसे संपले तर आरबीआय बँकेवर दंड आकारेल

Webdunia
बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (13:43 IST)
आपण एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि पैसे मिळाले नाहीत तर प्रचंड गैरसोय होते.आणि राग देखील येतो.आता आरबीआयने लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी एक योग्य पाऊल उचलले आहे.आपण पैसे काढायला गेल्यावर पैसे मिळाले नाही तर एटीएमशी संबंधित बँकेवर दंड आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे.लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये पैसे संपले असल्यास,आता आरबीआय संबंधित बँकेवर 10 हजार रुपयांचा दंड आकारेल आणि हा दंड संबंधित बँकांना 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख नसल्याबद्दल लावला जाईल. या निर्णयानंतर ग्राहकांना एटीएममधून पैसे सहज मिळू शकतील.
 
आरबीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे की, एटीएममध्ये रोख रक्कम न पाठवल्याबद्दल दंड आकारण्याचा हेतू लोकांच्या सोयीसाठी या मशीनमध्ये पुरेसा निधी उपलब्ध आहे याची खात्री करणे आहे. जून 2021 च्या अखेरीस देशभरात विविध बँकांचे 2,13,766 एटीएम होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत निधन

केजरीवालांच्या पराभवानंतर संजय राऊत अण्णा हजारेंवर का कडाडले

LIVE: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे मुंबईत निधन

उद्धव ठाकरे एकला चलो'च्या रणनीतीपासून यू-टर्न घेणार महापालिका निवडणुका एकत्र लढवणार!

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 31 नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments