Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BSNL ची खास ऑफर कॉलच्या बदल्यात कॅशबॅक!

bsnl
Webdunia
गुरूवार, 30 जुलै 2020 (11:22 IST)
BSNL च्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनीने आपली ‘5 pe 6’ ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  आधी ही ऑफर कंपनीने 31 जुलैपर्यंत वाढवली (BSNL new cashback offer) होती. त्यानंतर आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये (BSNLOffers) युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. या ऑफरमुळे ग्राहकांना दर महिन्याला 50 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
 
ही खास ऑफर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केली होती. जे युजर्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलतात त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. लोकांचा लँडलाइन कॉलिंगकडे कल वाढावा यासाठी कंपनीने ही कॅशबॅक ऑफर आणली होती. 
 
ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या (Reliance Jio)आययूसी चार्जच्या घोषणेनंतर कंपनीने या ऑफरची घोषणा केली होती. त्यावेळी जिओने अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. 
 
BSNL new cashback offer या ऑफरनुसार युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. यामध्ये एका ग्राहकाला दर महिन्याला जास्तीतजास्त 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. बीएसएनएलचे ग्राहक व्हॉइस कॉलद्वारे किंवा एसएमएस पाठवून 6 पैसे कॅशबॅक मिळवू शकतात. ही ऑफर बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) सब्सक्राइबर्ससाठी आहे.
 
बीएसएनएलची ही कॅशबॅक ऑफर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना 9478053334 नंबरवर ‘ACT 6 paisa’ टाइप करुन एसएमएस करावा लागतो. याशिवाय 18005991900 या टोल-फ्री क्रमांकावरव कॉल करुनही ही ऑफर अ‍ॅक्टिव्ह करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिर्डी : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

भंडारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ग्रामस्थांमध्ये घबराट

LIVE: RBI च्या स्थापना दिनानिमित्त द्रौपदी मुर्मू मुंबईत

भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू

रेशीम उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी होणार स्वावलंबी, महाराष्ट्र सरकारने केली योजना

पुढील लेख
Show comments