Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BYJU's Layoffs: बायजूने 1000 कर्मचाऱ्यांना काढले

byjus
Webdunia
मंगळवार, 20 जून 2023 (07:39 IST)
एज्युकेशन-टेक्नॉलॉजी कंपनी बायजूने पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. छाटण्यात आलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील असल्याची माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. तथापि, नवीन कर्मचार्‍यांच्या समावेशासह, कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 50,000 च्या आसपास आहे.
 
नवीन टाळेबंदी कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे दोन टक्के आहे. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जफेडीवरून अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असताना कंपनीतील टाळेबंदीची नवीन फेरी सुरू झाली आहे. बायजूने यापूर्वी सांगितले होते की ते ऑक्टोबर 2022 पासून पुढील सहा महिन्यांत सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल.
 
फेब्रुवारीमध्ये सुमारे 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले यामध्ये प्रामुख्याने डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादन वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बायजूने सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के होते.
 
बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये, कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते की नियोजित 2,500 च्या पुढे कोणतीही टाळेबंदी केली जाणार नाही. त्यानंतर सूत्रांनी सांगितले की कंपनी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, कस्टमर केअर, इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स आणि इतर क्षेत्रातील काही फंक्शन्स आउटसोर्स करण्याचा विचार करत आहे. 
 



Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments