Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्णय कठोर असल्यामुळे मोठा धक्का: मिस्त्री

Webdunia
मुंबई- टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले आहे. 
 
कॉर्पोरेट विश्वाच्या एकंदर इतिहासामध्ये या निर्णयासारखा दुसरा निर्णय सापडणे शक्य नसल्याची भावना व्यक्त करत मिस्त्री यांनी यासंदर्भात बोर्डावर टीका केली. याचबरोबर, बोर्डाची काम करण्याची पद्धत ही चुकीची व बेकायदेशीर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मिस्त्री यांनी यावेळी बोर्डाकडून काम करण्याचे स्वातंर्त्य मिळाले नसल्याचा आरोप केला.
 
अध्यक्षास कोणत्याही बचावाची संधी न देता अशाप्रकारे काढून टाकण्याची ही घटना कॉर्पोरेट विश्वाच्या इतिहासामधील एकमेव घटना असावी. बोर्डाच्या या कृतीमुळे टाटा समूहाच्या प्रतिष्ठेचे अमाप नुकसान झाले आहे. समूहामध्ये कॉर्पोरेट शासनव्यवस्थेचा असलेला पूर्ण अभाव आणि टाटा उद्योगसमूहामधील भागधारकांप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यामध्ये संचालकांना येत असलेले अपयश अधोरेखित करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे, असे मिस्त्री म्हणाले.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments