Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या 16 मार्च पूर्वी ऑनलाईन खरेदीसाठी डेबिट, क्रेडिट कार्ड संबंधित 'हे' काम करा

Webdunia
सोमवार, 9 मार्च 2020 (11:47 IST)
जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी डेबिट (Debit) किंवा क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 16 मार्चपासून आरबीआयचे काही नियम लागू होणार असून त्यानुसार तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन  ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करू शकत नाहीत. 15 जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या एका नोटीसनुसार, आरबीआयने क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संबंधित सुरक्षा आणि सुविधा वाढवण्यासाठी काही उपायांची घोषणा केली होती. आरबीआयने बँकांना असे सांगितले होते की, एखाद्या ग्राहकाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यामध्ये फक्त राज्यातील एटीएम आणि PoS Terminals संबंधित व्यवहार करण्याची सुविधा असणे अनिवार्य आहे.
 
आरबीआयने नवे नियम जाहीर करण्यात येणाऱ्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी 16 मार्च 2020 पासून लागू होणार आहे. ज्या व्यक्तींकडे आधीपासूनच कार्ड असून त्यांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणारआहे. त्यानुसार ग्राहकांना त्यांचे कार्ड ऑनलाईन, इंटरनशनल किंवा कॉन्टेक्सलेस ट्रान्झेक्शनसाठी वापर केला नसल्यास त्यांना अनिवार्य रुपाने त्या उद्देशांसाठी डिसेबल केले जाणार आहे. ग्राहकांना 24X7 क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन व्यवहाराची सीमा ठरवू शकणार आहेत. 
 
कार्ड देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था ग्राहकांना ही सुविधा प्रदान करतील ज्याद्वारे ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, पीओएस, एटीएम, ऑनलाईन व्यवहार किंवा संपर्कविरहित व्यवहारासाठी मर्यादा किंवा बदलू शकतात. दरम्यान, प्रीपेड गिफ्ट कार्ड्ससाठी 16 मार्च रोजी लागू हे आरबीआय नियम अनिवार्य नाहीत. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरबीआयचे हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे.

संबंधित माहिती

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments