Festival Posters

कॅशलेस व्यवहार करा, जिंका रोख पारितोषिके

Webdunia
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (13:33 IST)
केंद्र सरकारकडून ईकॉमर्स च्या मदतीने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी  नव्या योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. डिसेबर २५ पासून म्हणजेच नाताळच्या शुभमुहूर्तावर सुरवात होऊन १४ एप्रिल पर्यंत लागू असेल. यामध्ये ग्राहकांना एक कोटी पर्यंत जिंकण्याची संधी आहे.
 
यासंदर्भात निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर घोषित केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी ३४० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतील १५ हजारे ग्राहकांना दररोज प्रत्येकी एक हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हि योजना मुख्यत्वे जे ग्राहक कॅशलेस म्हणजेच ऑनलाइन पेमेंट करतील त्यांच्यासाठीच आहे. योजनेच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १४ एप्रिल रोजी एक कोटी रुपयांचे अंतिम पारितोषिक जाहीर करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला ५० लाख, तर तृतीय विजेत्याला २५ लाख रुपये मिळतील.व्यापारी वर्गासाठी डिजीटल धन व्यापारी योजनेअंतर्गत भाग्यविजेत्या व्यापाऱ्यांना आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. इतर ग्राहकांना देखील दर आठवड्याला सात हजार बक्षीसं जाहीर केली जातील.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पॅरासिटामॉलसह ९० औषधांचे नमुने अनधिकृत आढळले; कारवाई करण्याचे डीसीजीआयचे राज्य सरकारांना निर्देश

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार १७३७ नवीन रुग्णवाहिका सुरू करणार

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

पुढील लेख
Show comments