Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीएसटी 1 जुलैपासूनच

Webdunia
कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 जुलैपासूनच जीएसटी लागू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठीची सर्व तयारीही पूर्ण करण्यात आली असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
 
जीएसटी प्रणाली तातडीने लागू केली जाऊ नये, यासाठी काही घटकांकडून प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेमध्ये त्याबाबत अफवाही पसरवल्या आणि विविध समाजमाध्यमातून फिरवल्या जात असल्याने सरकारच्यावतीने पुन्हा एकदा जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत औद्योगिक क्षेत्रातील काही घटकांच्या विविध मागण्या आहेत. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मिश्रा यांनीही जीएसटीची अंमलबजावणी सुमारे एक महिनाभर पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तथापि केंद्र सरकार जीएसटीच्या 1 जुलैपासूनच्या अंमलबजावणीवर ठाम आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम (सीबीइसी) यासाठी कार्यरत असून त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून लहानात लहान व्यापाऱयांपर्यंत पोहोचण्यासाठी धडक मोहीम राबवली असल्याचा अर्थमंत्रालयाने दावा केला आहे.
 
महसूल हसमुख अढिया यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकार ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, जीएसटीची अंमलबजावणी लांबवणीवर टाकण्याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 1 जुलैपासून अंमलबजवणी करण्यावर सरकार ठाम असून याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अर्थखात्यानेही देशाच्या आर्थिक घडामोडींवर मोठी क्रांती घडवणारा निर्णय असून याच्या अंमलबजावणीसाठी अर्थखाते तयार असून 1 जुलैपासूनच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments