Festival Posters

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

Webdunia
शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:34 IST)
185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्रांची एक्‍सक्‍लुझिव्ह श्रेणी सादर करणार आहे.
 
आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे , विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते.
      
यंदाच्या वर्षी प्रामुख्याने मंगळसूत्रांचे प्रकार वजनाला हलके त्याचबरोबर पारंपरिक डिझाईन्स सुध्दा असणार आहेत.
 
या महोत्सवकाळात भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये आकर्षक अशा वैविध्यपूर्ण नवीन डिझाईन्स पाहायला मिळतील. या आकर्षक योजनेअंतर्गत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घडणावळीवर फ्लॅट 70 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर 30 टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार आहे.                          
 
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

पुढील ३ दिवस तीव्र उष्णतेची लाट, विदर्भात रेड अलर्ट

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments