Marathi Biodata Maker

विमानतळाचे नियम रेल्वेला होणार लागू, तिकीट नाही ना मग प्रवेश नाही

Webdunia
देशातील  प्रमुख रेल्वे स्टेशनवर तेथे  प्रवेशासाठी तिकिट घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार असाल तर तुम्हाला तिकिट घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणारच नाही. जसे विमान तळावर प्रवेश करण्यासाठी तिकिट आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी तिकिट अनिवार्य असणार आहे. 
 
सोबतच रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाधिकृत पद्धतीने कोणी आत प्रवेश करणार नाही. यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वेतील प्रवाशी, स्टेशनवर असलेले प्रवासी यांची सुरक्षा मुख्य लक्ष आहे. याकरीता आरपीएफ कंमाडोंना विेशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. 
 
कमांडो रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा देणार आहेत. देशातील गुजरातच्या गांधीनगर, भोपाळच्या हबीबगंज येथील रेल्वे स्टेशनवर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच  दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई येथील रेल्वे स्टेशनवर देखील याला सुरुवात होणार आहे. सरकारकडून 114 कोटींची तरतूद हे साध्य करण्यासाठी सरकारने 114 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 
या अंतर्गत एक असे मशीन लावण्यात येईल की त्यानुसार तिकिट असलेले कर्मचारीच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करु शकतील. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूना 3 हजार किलोमीटरची उंच भिंत उभारण्यात येईल. जेणेकरून कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही.आरपीएफचे महानिर्देशक अरुण कुमार यांनी प्रवाशांची सुरक्षा आमचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

ओला, उबर, रॅपिडो उद्या देशभरात बंद राहणार, कॅब चालकांनी देशव्यापी संप पुकारला

भारतीय महिला संघाचा क्वार्टर फायनलमध्ये चीनकडून पराभव, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर

ओडिशाच्या तीन न्यायालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या

आरसीबीने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकले

मुंबई पोलिसांनी ११ कोटी फसवणुकीच्या प्रकरणात ५ राज्यांमधून ७ आरोपींना अटक केली

पुढील लेख
Show comments