rashifal-2026

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, भाव वाढले

Webdunia
परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मंगळवारच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे .जास्तीत जास्त २६५० ,सरासरी २३०० रुपये तर कमीत कमी ८००  रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
 
कांदा हा भारतातील बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो कांदा हा प्रत्येक घरात वापरला जातो.त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली की सरकारला घामच फूटतो. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली असून आज उन्हाळ  कांद्याला जास्तीत जास्त २६३१ रुपये भाव जाहिर झाला.
 
सध्या बाजारात येणारा कांदा मार्च महिन्यापासून चाळीत साठवलेला आहे. तो बराच काळ साठवलेला असल्याने कांद्याचे वजन घटल्याने मिळणाऱ्या भावातून शेतकरी वर्गाचा झालेला खर्च आणि तोटा आत कुठे तरी निघण्यास सुरुवात झाल्याचे शेतकरी बोलत आहे .त्यामुळे कांद्याचे दर पाडण्यासाठी शासनाने आयात करणे, निर्यातबंदी करणे असे न करता जे काही शेतकऱ्यांना मिळत आहे ते मिळू द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल अशी विनंतीही बाजार समितीने केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नागपुरात भाजपचा महापौर असेल! नितीन गडकरींचा मोठा दावा

ओडेसा बंदरावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; आठ ठार तर 27 जखमी, ड्रोन हल्ल्याने युक्रेनचे प्रत्युत्तर

LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज

BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या नॉकआउटमध्ये सात्विक-चिराग जोडी, चिया आणि सोहचा पराभव

T20 WC India Squad: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, गिल-जितेश बाहेर; इशान आणि रिंकूचा समावेश

पुढील लेख
Show comments