Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा वाढले पेट्रोल- डिझेलचे भाव, मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक

Webdunia
गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (17:12 IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीला लागलेली आग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत 36 पैशांनी आणि डिझेलच्या किंमतीत 38 पैशांनी वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये देशातील सर्वात महाग दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे.
 
दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 106.54 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 95.27 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 112.44 रुपये आणि डिझेलची किंमत 103.26 रुपये प्रति लीटर आहे.
 
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे
 
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
 
तर राज्याच्या तसेच देशाच्या इतर भागांच्या तुलनेत श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक किमतीत विकले जात आहेत. अशा परिस्थितीत आता सामाजिक संघटनांना संताप येऊ लागला आहे. त्याचबरोबर आंदोलनाची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. श्री गंगानगरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर पंजाब सीमेवर पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर सुमारे दहा रुपयांनी स्वस्त उपलब्ध झाल्यावर स्थानिकांचा संताप आणखी वाढतो. जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांची बैठक बोलावून एक रणनीती तयार केली जाईल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जाईल. पंजाबमध्ये स्वस्त तेलाच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments