Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातुरला दुष्काळात रेल्वेने दिलेल्या पाण्याचे बिल माहीत आहे का ?

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (10:48 IST)
स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा असलेल्या लातूरमध्ये, दुष्कळात पिण्याचे पाण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे लातूरला पिण्यासाठीही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सांगली जिल्हयातील मिरजहून रेल्वेने पाणी पुरवण्यात आले होते, आज हि लातूरमध्ये दुष्काळी स्थिती कायम आहे. त्यामध्ये आता केंद्रीय  रेल्वे मंत्रालयाने लातूर महापालिकेला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. रेल्वेने मनपाला पत्र पाठवून नऊ कोटी रुपये बिल थकीत असल्याचं नमूद केले आहे. हे कोट्यवधी रुपयांचे थकीत बिल भरण्याची मागणी करण्यात आल्यामुळे लातूर महापालिकेसमोरच्या मोठी अडचण निर्माण केली आहे. लातूरला 2016 मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा केला होता. मिरज येथून दररोज 25 लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी पाठवण्यात आले, तर रेल्वेच्या टँकरने तब्ब्ल 111 फेऱ्यांमधून 25 कोटी 95 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला होता. हे पाणी आम्ही सामाजिक भावनेने पाणी देत आहोत, त्याचा कसलाही मोबदला आम्ही मागणार नाही, असं रेल्वेच्या वतीने त्यावेळी भूमिका घेतली होती. 
 
नंतर मात्र रेल्वेने लातूर महापालिकेला नऊ कोटींच्या थकीत बिल मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यावर राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तोडगा काढत हे बिल महापालिकेकडून घेऊ नये असं कळवण्यात आल. पण आता बिल भरण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच दुष्काळ, न महसुलाचे कोणते साधन व आर्थिक बिकट स्थिती असलेल्या लातूर मनपा कसे पैसे उभा करणार हा मोठा प्रश्न आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments