Dharma Sangrah

काय म्हणता, पावसामुळे कांद्याचे दर वाढणार

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:25 IST)
देशात विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांद्याच्या दरावर होण्यास सुरुवात झाली आहे. जर कांद्याचे दर वाढत राहिले तर यावर्षी दिवाळीला कांद्याचे दर गगनाला भिडणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेली महाराष्ट्राची लासलगावमध्ये सोमवारी कांद्याचा दर ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतातील कांद्याचे पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात कांद्याचे दर ६० रुपये प्रति किलो आहे.
 
दरम्यान कर्नाटकामध्ये देखील मुसळधार पावसामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. याचा सर्व परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. 
 
लासलगावात सोमवारी कांद्याचे कमाल भाव ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल, सरासरी भाव ६ हजार २०० रुपये आणि खराब कांद्याचा भाव १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. माहितीनुसार, लासलगाच्या मोठ्या व्यापाऱ्यांवर १४ ऑक्टोबरला आयकर विभागाची धाड पडली. यानंतर भीतीमुळे व्यापारी मंडईत येत नव्हते. पण सोमवारी व्यापारी मंडईत पोहोचले आणि कांद्याचे दर वाढले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

कन्फर्म झालेली तिकिटे रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल, नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू

थॉमस कपमध्ये लक्ष्य सेन भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार

सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा खालावली सर गंगा राम रुग्णालयात दाखल

व. पु. काळे यांचे 10 विचार

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू

पुढील लेख
Show comments