Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता, पावसामुळे कांद्याचे दर वाढणार

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:25 IST)
देशात विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांद्याच्या दरावर होण्यास सुरुवात झाली आहे. जर कांद्याचे दर वाढत राहिले तर यावर्षी दिवाळीला कांद्याचे दर गगनाला भिडणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेली महाराष्ट्राची लासलगावमध्ये सोमवारी कांद्याचा दर ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतातील कांद्याचे पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात कांद्याचे दर ६० रुपये प्रति किलो आहे.
 
दरम्यान कर्नाटकामध्ये देखील मुसळधार पावसामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. याचा सर्व परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. 
 
लासलगावात सोमवारी कांद्याचे कमाल भाव ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल, सरासरी भाव ६ हजार २०० रुपये आणि खराब कांद्याचा भाव १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. माहितीनुसार, लासलगाच्या मोठ्या व्यापाऱ्यांवर १४ ऑक्टोबरला आयकर विभागाची धाड पडली. यानंतर भीतीमुळे व्यापारी मंडईत येत नव्हते. पण सोमवारी व्यापारी मंडईत पोहोचले आणि कांद्याचे दर वाढले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments