Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:52 IST)
रुपयाच्या घसरणीमुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments