Dharma Sangrah

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:52 IST)
रुपयाच्या घसरणीमुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments