Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Reliance Jio ने दोन स्वस्त प्लॅन केले बंद करून युजर्सना झटका

Webdunia
मंगळवार, 21 जुलै 2020 (11:04 IST)
आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या JioPhone युजर्सना झटका दिला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला JioPhone युजर्ससाठी आणलेले दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Jio Reacharge Plan discontinues) कंपनीने बंद केले आहेत.
 
कोणते प्लॅन केले बंद?:-
फेब्रुवारी महिन्यात JioPhone युजर्ससाठी कंपनीने 49 रुपये आणि 69 रुपयांचे हे दोन स्वस्त प्लॅन आणले होते. पण आता हे दोन्ही प्लॅन कंपनीने बंद केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. याशिवाय दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा वेगवेगळ्या होत्या. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 SMS मिळायचे. तर, 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये जियो टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 7GB डेटा, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 SMS मिळायचे. याशिवाय दोन्ही प्लॅन्समध्ये जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन दिलं जात होतं.
 
पर्याय काय?:- (Jio Reacharge Plan discontinues)
आता हे दोन प्लॅन बंद झाल्याने जिओफोन युजर्ससाठी 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन असणार आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 0.1GB डेटा मिळतो, म्हणजे एकूण 3 जीबी डेटा युजर्सना मिळतो. तसेच, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी 500 नॉन-जिओ मिनिटे आणि 50 SMS मिळतात. याशिवाय जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही युजर्सना मिळेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments