Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु

सुनो आरबीआय क्या कहता है नावाची मोहीम सुरु
Webdunia
फोन कॉल्स, SMS च्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे लक्षात घेऊनच केंद्रीय बँकांकडून बँकेच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी 'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
 
या मोहीमेअंतर्गत ऑनलाईन सुरक्षीत व्यवहार करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारा दरम्यान होणाऱ्या फसवणुकीसाठी वाचण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना मोबाईलवर SMS पाठवले जात आहेत.
 
ग्राहकांना सावध करण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यासोबतच एक नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल. आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यात येतील. तुम्हालाही आरबीआयचा एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments