Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटो दर शंभरी पार…! या शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या पुढे

टोमॅटो  दर शंभरी पार…! या शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या पुढे
Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (21:43 IST)
मुंबई : देशात टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. टोमॅटोंचे दर 100-120 रुपये प्रति किलो झाले आहेत. यामुळे अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलंय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वापरण्यात येणारा टोमॅटो विकत घेणे परवडेनासे झाले आहे. टोमॅटोचे भाव गेल्या काही दिवसांत दुप्पट ते तिप्पट झाले आहेत.
 
दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसह सर्वत्र टोमॅटोच्या दराने किचनचे बजेट बिघडवले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.
 
मुंबईतील भायखळा भाजी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत टोमॅटो 30 ते 40 रुपये किलोने विकले जात होते. मात्र आज येथे 80 ते 90 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. केवळ टोमॅटोच नव्हे तर सर्वच भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्क्यांनी वाढले असल्याचे भाजी विक्रेते सांगतात.
 
टोमॅटो दिल्लीत 100 ते 140 रुपये किलो, तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये 160 रुपये किलो, गाझियाबादमध्ये 150 रुपये किलो आणि कानपूरमध्ये 100० रुपये किलोने मिळत आहे. घाऊक विक्रेते सांगतात की, गेल्या महिन्यात मंडईत टोमॅटोचा भाव 8-10 रुपये किलो होता, तर आता भाजीपाला बाजारात टोमॅटोचा भाव 70-80 रुपये किलो आहे. टोमॅटो खरेदीसाठी मंडईत आलेले किरकोळ व्यापारी सांगतात की, आता लोक पूर्वीपेक्षा कमी टोमॅटो घेत आहेत.
 
दरवर्षी टोमॅटो काढणीच्या वेळी टोमॅटो स्वस्त होतात आणि पाऊस सुरू होताच टोमॅटोचे पीक संपून टोमॅटोचे भाव वाढतात. त्याचा फटका दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही बसतो. टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे टोमॅटोचे पीक संपले असून आता इतर राज्यांतून टोमॅटोची आयात करावी लागत असल्याने मालवाहतूक वाढली आहे.
 
महिनाभरापूर्वी टोमॅटो 10 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, मात्र साठवणुकीची सोय नसल्याने शेतकरी टोमॅटो साठवू शकत नाहीत. काढणीच्या वेळी टोमॅटोचे भाव खूपच कमी होतात. पीक संपल्याबरोबर टोमॅटोचे भाव गगनाला भिडायला लागतात. शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअर्स मिळाले, तर टोमॅटो वर्षभर साठवून वापरता येतील.
 
दरम्यान पुढील महिनाभर टोमॅटोचे दर वाढतच राहणार असल्याचे टोमॅटोच्या घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पीक बाजारात आल्यानंतरच भाव खाली येतील. मात्र, टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघेही हैरान झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments