Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटोचे भाव वधारले, टोमॅटो ने शंभरी गाठली

Webdunia
मंगळवार, 24 मे 2022 (13:24 IST)
मुंबईत बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दराने 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडला असून किरकोळ बाजारात देखील टोमॅटोचे दर 90  ते 100  रुपये झाले आहे. या मुळे लोकांच्या अडचणीत भर पडली आहे.दक्षिणेतील काही राज्यांना महाराष्ट्रातून टोमॅटो ची पुरवणी केली जाते. अलिकडच्या काळात टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना दिसत होता. मात्र, आता टोमॅटो उत्पादक
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर या महागाईने मध्यम व गरीब वर्गाची चिंता वाढवली आहे. भाज्यांचे भाव  भाजीपाल्याची दुकाने आणि मॉल्समध्ये भाव 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत.कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोची रोपटे जळाली पीक खराब झाल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न घटल्यामुळे टोमॅटोला चांगलाच भाव मिळत आहे. 
 
कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजारात टोमॅटोचे कॅरेट800 ते 1100 रुपयापर्यंत मिळत असून, किरकोळ बाजारात टोमॅटो 80 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

राज्यात टोमॅटोचा समावेश सर्व आहारात केला जातो. त्यामुळे टोमॅटोची मागणी वाढली आहे. दक्षिणेतील राज्यांमधून टोमॅटोची अवाक होते. गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत टोमॅटोची कमतरता झाली आहे. त्या राज्यात महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा केला जातो. टोमॅटोला जास्त मागणी असल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले आहे. टोमॅटोच्या दारात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments